कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत राज्य शासन कृषी विभाग आणि इतर संशोधन संस्थांच्या मदतीने सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये सुरू आहे.
खरीप हंगाम पूर्व अभियानामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे सर्व शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय डाळिंब कृषी संशोधन केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि पशुवैद्यकीय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तीन टीम च्या स्वरूपात कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे अभियान राबवत आहेत.
हे अभियान तिन टीमच्या मदतीने एकाच वेळी जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये म्हणजेच सध्या मंगळवेढा आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये राबवले जात आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये ब्रह्मपुरी येथे दिनांक १ जून २०२५ रोजी कृषी रथाचे उद्घाटन मंगळवेढा -पंढरपूरचे मा. आमदार श्री समाधान अवताडे यांचे हस्ते व कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.लालासाहेब तांबडे, मंगळवेढ्याच्या तालुका कृषी अधिकारी सौ मनीषा मिसाळ, पंचायत समिती मंगळवेढा चे माजी सभापती श्री प्रदीप खांडेकर, डॉ. पि.के. पवार , डॉ .दिनेश बाबू, डॉक्टर विजयसिंह लोणकर, डॉ. पी जी पाटील यांची उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमांमध्ये सन्माननीय आमदार यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले, तसेच कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत राबवल्या जाणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाची स्तुती केली. डॉ. लालासाहेब तांबडे यांनी ऊस पिकांमधील पाणी आणि अन्नद्रव्यवस्थापन आणि भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पीक व्यवस्थापन यावर माहिती दिली.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी फलोत्पादन उत्पादनावर तर शिरवळच्या पशुसंवर्धन महाविद्यालयाचे डॉ. विजयसिंह लोणकर यांनी चारा व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. तालुका कृषी अधिकारी सौ. मनीषा मिसाळ यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असणारे योजना बद्दल सविस्तर माहिती दिली.
मंगळवेढा तालुक्यामध्ये हे अभियान राबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे विषय विशेषज्ञ सर्वश्री अमोल शास्त्री, श्री विकास भिसे, सो अनिता शेळके, श्री रोहित लंगोटे आदीं प्रयत्न करत आहेत. ब्रह्मपुरी येथील कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य शेतकरी व ग्रामीण महिला उपस्थित होत्या.
उत्तर सोलापूर मधील डोणगाव, नंदुर व पात्री येथे दिनांक 2 जून 2025 रोजी विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले. डोणगाव येथील कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे, उत्तर सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी श्री. धनंजय शेटे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी प्राध्यापक, डॉ. आदिनाथ ताकटे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ, डॉ. नम्रता गिरी व डॉ. रूपा स्वजय, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे विषय विशेषज्ञ सर्वश्री प्रदीप गोंजारी, डॉ. प्रकाश कदम, श्री समाधान जवळगे तसेच गावचे सरपंच आदीं उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये बीज प्रक्रिया चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तर डॉ. लालासाहेब तांबडे यांनी जमीन सुधारणा भू सुधारकांचा ऊस उत्पादनासाठी वापर याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच भविष्यातील शेती यावर भाष्य केले. कार्यक्रमादरम्यान शास्त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या अभियानासाठी कृषी विज्ञान केंद्र सोलापूर च्या कार्यक्षेत्रातील 90 गावाची निवड करण्यात आलेली आहे.
टप्प्याटप्प्याने या सर्व गावांमध्ये हे अभियान सध्या मंगळवेढा व उत्तर सोलापूर तालुक्यात राबवले जात आहे, विविध गावांमध्ये सदरील अभियान जात आहे त्याला शेतकरी ग्रामीण युवक व महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तसेच या अभियानाच्या माध्यमातून प्रगतिशील शेतकरी यशस्वी महिला व युवक कृषी उद्योजक यांचे अनुभव ऐकण्याची संधी पण प्राप्त होत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून खरीप हंगामातील पिकाचे सुधारित कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत केले जात आहे, दोन कृषी रथाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर, सर्व तालुका कृषी अधिकारी, एम एस आर एल एम चे अधिकारी व ग्राम पातळीवरील महिला यांचे सहकार्य लावत आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शास्त्रज्ञ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ग्राम पातळीवरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित गावचे सरपंच ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभ आहे. कृषी संकल्प अभियानाच्या पुढील कार्यक्रमास शेतकऱ्यांनी अजून प्रतिसाद वाढवावा असे आव्हान कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केले आहे.