या फळाचा नाद केला…अन समृद्धी आली…!!
सेंद्रिय कापसापासून कापडापर्यंत…
आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणार्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्या शेतातून भागविता येतात का? कुठलेही रसायन, खत न वापरता शेती करता येते का, या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळते, रामभाऊ महाजन यांच्या स्वावलंबी जीवनशैलीतून. खाद्यतेलापासून ते कापडापर्यंतच्या गोष्टी ते घरीच नवितात. त्यामुळेच बाजारात कापसाचे भाव पडले तरीही त्यांच्या चेहर्यावर नाराजी दिसत नाही.
पिक पद्धत बदलून फुलांचे आगार बनलेल्या तालुक्याची गोष्ट
धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यात पॉलीहाऊसमधील फुलशेतीने चांगलाच जोर धरला असून, गट शेतीच्या माध्यमातून शनिशिंगणापूर, वडाळा (बहिरोबा), कांगोणी परिसरात ग्रीन हाऊसमध्ये जरबेरा फुलांचे उत्पादन घेतले जात आहे. उसासारख्या पारंपरिक नगदी पिकांपासून फुलशेतीकडे वळालेले हे शेतकरी फुल शेतीतून चांगले उत्पन्न मिळवित आहेत. कृषी विभागाचे प्रोत्साहन व सहकार्य मिळत असल्याने दिवसेंदिवस अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत.
यशोगाथा आवळा शेतीतून साधली प्रगती
देशात सर्वत्र महिला सशक्तीकरणा संदर्भात विविध कार्यक्रम, आयोग, व इतर बाबींच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, यामधून अनेक महिला शेतकरी पुढे येत आहेत व यशस्वी ठरत आहेत. मनात जिद्द व चिकाटी असली कि परिश्रमाच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट साध्य करता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांनी आपल्या कल्पनेला आकार देत आवळ्याची शेती करून त्यातूनच वेगवेगळे तब्बल १० प्रकारचे पदार्थ तयार केले आहेत. त्या उत्पादनातून महिनावारी एक ते दीड लाखापर्यतचा शुद्ध नफा कमावून शेतीला पूरक जोडधंदाचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे.