Posted inबातम्या
हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी
हरभर्याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी या पिकाचे पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. चुकीचे पाणी व्यवस्थापन झाल्यास उत्पादन वाढीऐवजी उत्पादनात घट येऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करीत असताना जमिनीचा मगदूर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हलक्या जमिनीत पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या तर मध्यम ते भारी जमिनीत पाण्याच्या २ ते ३ पाळ्या योग्य वेळी आवश्यक असतात.