svamitva scheme: शेतकऱ्यांना मिळणार मालमत्तेचे स्वामीत्व कार्ड

svamitva scheme: शेतकऱ्यांना मिळणार मालमत्तेचे स्वामीत्व कार्ड

SVAMITVA scheme card for Maharashtra farmers राज्यातील ३० जिल्ह्यात सूमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ

राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठानात आपल्या वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायीक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी केंद्राने स्वामित्व योजना जाहीर केली.

या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यातील सुमारे 30 हजार 515 गावांमधील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग देणाऱ्या स्वामीत्व योजनेचा महाशुभारंभ राज्यातील 30 जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या 27 तारखेला होत आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाही तर काय करावे?

स्वामीत्व कार्डचा काय फायदा होणार?

अनेक गावात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद-विवाद होतात. (Benefit of svamitva scheme card) जमिनीच्या कागदपत्रांबद्दल अनेकांना परिपूर्ण माहिती नसते. काही गावात इतरांच्या जमिनीवर कब्जा सारखे प्रकार होतो. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासह अधिक पारदर्शकतेच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

grape farmer: द्राक्षासह शेतकरी फसवणुकीविरोधात होणार नवा कायदा

शेतकऱ्यांचे मालमत्ता कार्ड म्हणजे स्वामीत्व कार्ड (Svamitva scheme)

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीमुळे गावकर्‍यांना हक्काचे मालमत्ता कार्ड प्राप्त होईल. घरकर्जासारखी सुविधा मिळण्यासाठी हे मालमत्ता कार्ड महत्त्वाचा दस्तऐवज राहील. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना घरासाठी, तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

गावातील जमिनीचे योग्य पद्धतीने मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणार्‍या कराची आकारणी उत्तम प्रकारे मिळणार आहे. तसेच ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढणार आहे. यामुळे गावातील विकास कामांना गती मिळेल.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *