Monday, December 1

योजना

पशुसंवर्धन योजनांसाठी आता एकदाच अर्ज; मोबाईल ऍपद्वारे लाभ
योजना

पशुसंवर्धन योजनांसाठी आता एकदाच अर्ज; मोबाईल ऍपद्वारे लाभ

ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवतानाच पुन्हा अर्जाची प्रक्रिया करावी लागू नये म्हणून प्रतीक्षा यादीची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी व पशुपालक बांधवांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली. या योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव खेरडे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालक बांधवांना मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येत असून, प्रतीक्षा यादीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे पुन...
जनावरांचा विमा काढलाय? अशी आहे योजना
योजना

जनावरांचा विमा काढलाय? अशी आहे योजना

शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे दोन स्रोत असतात, एक शेती करतो आणि पशुपालन. तो गाय, म्हशीचे दूध विकतो आणि बैलांच्या मदतीने शेत नांगरून शेती करतो. शेतकऱ्यासाठी पीक आणि प्राणी या दोघांसाठीही काळजीचे कारण असते. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नासाडी होते, त्याचप्रमाणे जनावरेही रोग, हवामान किंवा अपघाताला बळी पडतात. अनेक शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढतात पण जनावरांचा विमा काढायला विसरतात, ज्याची किंमत हजारांत असते, गाय किंवा म्हैस दुभती असेल तर त्याची किंमतही लाखांत असते. अशा स्थितीत शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पशुधन विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत नोंदणीकृत शेतकरी बांधवांची जनावरे दगावल्यास त्यांना त्यांची भरपाई दिली जाते जेणेकरून नुकसान भरून काढता येईल. पशुधन विमा योजना काय आहे आणि त्याचे फायदे कसे मिळवायचे ते जाणून घ्या - पशुधन विमा य...
शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रावर अनुदान
योजना

शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रावर अनुदान

विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, मजुरांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी, जीवनशैलीतील बदल यामुळे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावल्यामुळे दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या भेडसावत आहे. कुशल मजूर उपलब्ध न झाल्यामुळे उभ्या पिकाची नासाडी होण्याची शक्यता निर्माण होते. ऊस तोडणीस उशीर झाल्यास साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत असल्यामुळे उसाला कमी भाव मिळतो. यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी बदलत्या काळातील तंत्रज्ञानाचा विचार करता पारंपरिक पद्धतीचे ऊस तोडणीबरोबरच यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करणे आवश्यक झाले आहे. या क्षेत्रात खाजगी साखर कारखान्यांकडून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे, भविष्यात ऊसतोडणी वेळेवर आणि कमी खर्चात करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करण्याकडे आता शेतकरी व साखर कारखाने वळ...
शेतकरी, शेत मजुरांसाठी योजना; दोन रुपये रोज गुंतवा आणि वृद्धापकाळात निश्चिंत जगा
योजना

शेतकरी, शेत मजुरांसाठी योजना; दोन रुपये रोज गुंतवा आणि वृद्धापकाळात निश्चिंत जगा

प्रत्येकालाच त्यांच्या निवृत्तीनंतरची चिंता असते. काही लोक त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासूनच सेवानिवृत्ती योजनांबद्दल विचार करू लागतात, जेणेकरून त्यांना वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहावे लागू नये. मात्र जे मजुरी करतात, शेतकरी आहेत, कुठे रोजगार मिळवितात किंवा हातावरचा व्यवसाय आहे, अशा लोकांना सरकारी किंवा खासगी नोकरीतील लाभ मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन भारत सरकार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत पेन्शन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या योजनेत दररोज 2 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केल्यास वर्षाला भविष्यात 36 हजार रुपये मिळू शकतात. या योजनेबद्दल जाणून घेऊया. कोण पात्र आहेत? १८ ते ४० वयोगटातील व्यक्ती या योजनेत सामील होऊ शकते. लाभार्थीचे मासिक उत्पन्न १५ हजार  रु. पेक्षा कमी असावे. तो EPFO ​​आणि NPS अंतर्गत येऊ नये. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार क...
भंगार कारमधूनही कमवा एक ते दीड लाख
योजना

भंगार कारमधूनही कमवा एक ते दीड लाख

भंगारातल्या कारमधून कसे काय पैसे मिळवायचे? असा प्रश्न पडला असणार, पण हे शक्य आहे. समजा तुम्ही तुमची कार १० ते १५ वर्षे पुरेपूर वापरली असेल आणि ती इतकी खराब आहे कि कोणी ती विकतहि घेणार नाही. स्वाभाविकपणे मग ती कार भंगारात देणेच योग्य. पण या कारची तुम्हाला उत्तम मोल मिळू शकते. केद्र सरकारच्या नव्या स्क्रॅप धोरणानुसार तुम्हाला ती भंगारात द्यायची आहे, तर तुमची कार स्क्रॅप केल्यानंतर तुम्ही नवीन कार खरेदी केल्यास तुम्हाला थेट 5% सूट मिळेल. याशिवाय नोंदणी शुल्कही आकारले जाणार नाही, म्हणजे तुमचे एक ते दीड लाख रुपये वाचतील. दरम्यान नोएडामध्ये जुन्या वाहनांचा रिसायकल करण्यासाठी युनिट सुरू केले आहे. टोयोटा आणि मारुती वाहनांसाठी हे भंगार केंद्र सुरू करण्यात आले असून, त्यासाठी 44 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भंगारात जुन्या गाड्या कशा विकायच्या स्क्रॅप धोरणांतर्गत 10 ते 15 वर्षे जुनी वाहने स्क्र...
शेतकरी मित्रांनो; तुम्हीच तयार करा वीज; पैसेही कमवा
योजना

शेतकरी मित्रांनो; तुम्हीच तयार करा वीज; पैसेही कमवा

महागाई वाढत आहे, त्यावर मात करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. त्यातही तुम्ही शेती करत असाल,  ग्रामीण भागात असाल किंवा तुमचे स्वतःचे घर असेल किंवा इमारतीत तुमच्या बाल्कनीमध्ये पुरेसे ऊन येत असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे असे समजा. काय आहे योजना? या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सोसायटीच्या गच्चीवर किंवा राहत्या घराच्या छपरावर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे सोलर फोटो व्होल्टाइक पैनल द्वारे वीजनिर्मिती केली जाते यामध्ये निर्माण झालेली वीज थेट महावितरण च्या जाळ्याला (ग्रीड) ला जोडली जाऊ शकते. आपल्या घरावरच्या सोलर पैनल मधून तयार होणारी अतिरिक्त वीज ग्राहक विकून पैसेहि कमवू शकतात. अशी संयंत्रे आता ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. त्यातून दररोज एक ते आठ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. दिवसा ही वीज फारशी वापरली जात नाही. अशी न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येते. यातून भारनियमन बंद होईलच; ...