Monday, December 1

शेती तंत्र

खरीपातील भुईमुगाची लागवड
शेती तंत्र

खरीपातील भुईमुगाची लागवड

भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती. जमीन मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. सुधारित वाण अ.क्र वाण प्रकार हंगाम पक्क होण्यास लागणारा कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं/हें) शिफारस १ एस.बी -१२ उपटी खरीप/उन्हाळी १०५-११०     ११५-१२० १२-१५      १५-२० संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ जे.एल- २४ (फुलेप्रगती) उपटी खरीप ९०-९५ १८-२० संपूर्ण महाराष्ट्रासाठी ३ टी.अे.जी – २४ उपटी खरी...
खरीप विशेष : कमी पावसात लाभ देणारे उडीद
शेती तंत्र

खरीप विशेष : कमी पावसात लाभ देणारे उडीद

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी  ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. जमीन मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्वमशागत उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळावच्या पाळ्या मारुन सपाट करावी. धसकटे वेचून घ्यावीत. याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. सुधारित वाण मुगाच्या सुधारित जाती १ कोपरगाव कालावधी ६५ ते ७० दिवस, मर व करपा, पिवळा केवडा रोग प्रतिकारक्षम, उत्पादन ३-१० क्विं/हे २ बीएम ४ कालावधी ६५ ते ६७ दिवस, करपा व भूरी रोगास प्रतिकारक, मध्य भारतासाठी शिफारस, उत्पादन ...
सुपीकता वाढीसाठी कडधान्य पिके फायद्याची
शेती तंत्र

सुपीकता वाढीसाठी कडधान्य पिके फायद्याची

कडधान्य पिकांच्या मुळावर सूक्ष्म जिवाणूच्या गाठीमुळे हवेतील नत्र शोषून जमिनीत स्थिर केले जातो व जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. या पिकांची मुळे खोलवर पसरून खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून ते वरच्या थरात उपलब्ध स्थितीत आणून सोडतात. ही पिके जमिनीवर पसरलेल्या स्थितीत वाढून जमीन जास्तीत जास्त झाकतात. त्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण होते. या सर्व घटकांव्यतिरिक्त कडधान्य पिकांचे उत्पादनही मिळते आणि जमिनीची सुपीकता व उत्पादकतादेखील वाढते. मानव, पशुधन व जमिनीच्या आरोग्यासाठी कडधान्य पिकांच्या लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. (more…)...
कापूस आधारित पीकपद्धती फायद्याची
शेती तंत्र

कापूस आधारित पीकपद्धती फायद्याची

सद्य:परिस्थितीत महाराष्ट्रात जास्तीत जास्त भागात कापसाची सलग लागवड करतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, तसेच रोग आणि किडीचा प्रादूर्भाव यामुळे कापसाचे होणारे नुकसान टाळणे अशक्य आहे; परंतु सलग पिकाऐवजी कापूस आधारित पीकपद्धतीचा शेतकर्‍यांनी अवलंब केला तर असे होणारे नुकसान काही अंशी टाळता येते व प्रति एकरी शेतकर्‍यांना पैसेरूपी जास्त फायदा होऊ शकतो. पीकपद्धतीचे फायदे * अतिवृष्टी किंवा पावसाचा ताण, तसेच रोग व किडी यामुळे होणारे नुकसान काही अंशी भरून निघते. * उत्पादनात स्थिरता निर्माण होऊन प्रति एकरी जास्त नफा मिळतो. * पीकपद्धतीत कडधान्य पिकांचा अंतर्भाव होत असल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म वाढते. * आंतर पिकापासून शेतकर्‍यास लवकर पैसा मिळतो व हा पैसा शेती व्यवहारासाठी मध्यंतरीच्या काळात वापरता येतो. * थोडक्यात, विविध पीकपद्धतींमुळे उपलब्ध असलेल्या जमीन, पाणी, हवा व प्रकाश यांचा प...
खरीप विशेष : बाजरी लागवडीचे नवीन तंत्र
शेती तंत्र

खरीप विशेष : बाजरी लागवडीचे नवीन तंत्र

बाजरी हे पीक हलक्या ते मध्यम जमिनीवर, जेथे पावसाचे प्रमाण २०० ते ७०० मि. मि. आहे, अशा प्रदेशांत घेतात. कमी पाण्यावर येणारे हे पीक असल्याने खत आणि तणांचे योग्य व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेता येणे शक्य आहे. पूर्वमशागत लोखंडी नांगराने जमिनीची १५ सें. मी. पर्यंत खोल नांगरट करावी. यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकांची धसकटे, काडीकचरा, हरळी, कुंदा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणीअगोदर हेक्टरी पाच टन शेणखत किंवा कम्पोस्ट शेतात पसरवून टाकावे. पेरणीची वेळ पेरणी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यावर करावी. पेरणी १५ जून ते १५ जुलै या दरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. पेरणीस उशीर झाल्यास पिकावर गोसावी, अरगट रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. धूळ पेरणी करावयाची असल्यास जून महिन्याच्या दुसर्‍या ते तिसर्‍या आठवड्यात करावी. धूळ पेरणी एकूण क्षेत्...
बियाणे पेरणी करून कांदा उत्पादन
शेती तंत्र

बियाणे पेरणी करून कांदा उत्पादन

कांदा पिकाचे उत्पादन मुख्यत्वे रोपांची पुनर्लागवड करून घेतले जाते. कांदा उत्पादन बियाणे पेरून घेणेही शक्य आहे. कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील पठारी भागात पावसाळ्यात कांदा बियाणे पेरून उत्पादन घेतले जाते. कांदा बियाणे पेरून उत्पादन घेतल्यास कांदा काढणीसाठी हवामानानुसार पेरणीपासून चार महिन्यांत लागतो. उशिरा लांबलेल्या पावसामुळे जिरायत भागात कांदा रोपे टाकली गेली नाहीत, अशा ठिकाणी या पद्धतीने कांदा उत्पादन घेणे सहज शक्य होईल. अशा पध्दतीने उत्पादन घेण्यासाठी खालील काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. १.प्रतिकूल हवामान २.रोपे टाकण्याचा काळ निघून जाणे. ३.मजुरांची टंचाई ४.शेतामध्ये तणांचे प्रमाण अत्यल्प असल्यास प्रतिकूल हवामानात नैसर्गिक आपत्तीमुळे रोपांचे नुकसान होते. यामुळे कांदा पीक नियोजन कोलमडते. कधी-कधी कांदा उत्पादन क्षेत्रात पाण्याची उपलब्धता नसल्याने कां...