Sunday, November 30

बातम्या

यंदाच्या खरिप पिकांच्या हमीभावात वाढ; बघा कोणत्या पिकाची किती किंमत वाढली
बातम्या

यंदाच्या खरिप पिकांच्या हमीभावात वाढ; बघा कोणत्या पिकाची किती किंमत वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत खरीप पिकांच्या2021-22 च्या विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत ( एमएसपी ) वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली. पिक उत्पादकाला, त्याच्या  कृषीमालासाठी लाभकारक मूल्य सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने,  2021-22 च्या विपणन हंगामासाठी, खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ  केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या एमएसपी मध्ये सर्वोच्च (452 रुपये प्रती क्विंटल) वाढ करण्यात आली आहे, त्यानंतर तूर आणि उडीद  (300 रुपये प्रती क्विंटल) वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेंगदाणासाठीच्या एमएसपी मध्ये 275 रुपये प्रती क्विंटल आणि कारळ बिया यामध्ये 235 रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात आली आहे. पिक वैविध्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही भिन्नता ठेवण्यात आली आहे. खरीप पि...
उत्पादन तंत्र : पौष्टिक आणि शक्तिदायक नाचणी पिक
बातम्या

उत्पादन तंत्र : पौष्टिक आणि शक्तिदायक नाचणी पिक

राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. हे पीक राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते. यात ६ ते ११% प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स...
उत्पादन तंत्र : खरीपातील उत्पन्न मिळवून देणार तूर
बातम्या

उत्पादन तंत्र : खरीपातील उत्पन्न मिळवून देणार तूर

खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला २१ ते २५० से.ग्रे.तापमान चांगले मानवते. महाराष्ट्रामध्ये १० लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर तूर हे पीक घेतले जाते. जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी फार चांगली. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. पूर्वमशागत रबी हंगामाचे पीक निघाल्यानंतर चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी व कोप इ. नष्ट होतात जमीन चांगली तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते. अन्नद्रव्ये मुक्त होतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. योग्य वाणांची निवड मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले वाण अ.क्र वाणाचे नाव वैशिष्टये १ बीडीएन -२ दाण्याचा रंग पांढरा, १५५-१६५ द...
उत्पादन तंत्र : अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे बाजरी पीक
बातम्या

उत्पादन तंत्र : अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे बाजरी पीक

बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्‍य होईल. बाजरी पिकांचे महत्त्व पाऊस उशिरा, अनिश्‍चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व आहे. कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पीक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात. सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांमधील सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पीक म्हणून उपयोग होतो. बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड, अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर) दिल्यास अंड्यामधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे (LDL) प्रमाण हे मक्‍यापासून बनविलेल्या पोल्ट्री फीडच्या वापरातून उत्पादित अंड्यामधील ...
जाणून घ्या…लॉकडाऊन चा दुग्धव्यवसायावरील परिणाम
बातम्या

जाणून घ्या…लॉकडाऊन चा दुग्धव्यवसायावरील परिणाम

राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असली तरी तिचा तितकासा परिणाम जाणवत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यावर खबरदारीचा उपाय म्हटले तर नुसते हात साबणाने धुऊन किंवा तोंडावर मास्क लावून चालणार नाही तर आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये शाकाहारींसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच फळे व भाजीपाला आणि मांसाहारीसाठी अंडी, चिकन, मटण यांचा देखील समावेश करणे गरजेचे आहे. दूध हे रोजच्या आहारात लागणारी महत्वाची गरज असल्याने ते लहान बाळापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना चालते. शरीराच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक त्याच्यामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे दुधाला पूर्णान्न म्हणून देखील संबोधले जाते. बहुतेक करून सगळ्याच घरांमध्ये दिवसाची सुरवात हि च...
कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर होणार कारवाई
बातम्या

कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर होणार कारवाई

कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई, दि.१२ :- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. कृषि मंत्री यांच्या दौऱ्‍या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे सिंधुदुर्गचे आमदार  वैभव नाईक यांनी निदर्शनास आणून दिले होते. याबाबत कृषि मंत्री यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील, यांच्याशी संवांद साधून निदर्शनास आणून दिले. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पणन मंत्री यांच्या सुचनेनूसार कृषि उत्...