Monday, December 1

बातम्या

राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार
बातम्या

राज्यातील नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार

मुंबई, दि. 12: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल. नाट्यगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित)सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे  समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकारगण आणि कर्मचारी ...
विशेष : सोयाबीनचे भाव घसरले, मात्र चिंता नको
बातम्या

विशेष : सोयाबीनचे भाव घसरले, मात्र चिंता नको

कृषी पंढरी विशेष :  औरंगाबाद, दि. 22 : दोन दिवसांपूर्वी लातूरच्या बाजारात सोयाबीनच्या  (soybean rate issue) भावात तब्बल तीन हजार रूपयांनी घसरण झाली आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला. जुलै महिन्यात दहा हजारावर गेलेले भाव दोन दिवसांपूर्वी साडेपाच हजारावर आले. त्यामुळे ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात भावाच्या घसरणीला सामोरे जावे लागते की काय? अशी चिंता शेतकºयांमध्ये दिसत आहे. तथापि शेतकºयांचे सोयाबीन बाजारात आल्यानंतरही सोयाबीनचे (soybean import in India) भाव हे पाच हजार रूपये प्रति क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता कमी असून शेतकरी बांधवांनी त्यासंदर्भात काळजी करू नये असे आवाहन बाजारविषयक तज्ज्ञांनी केले आहे. अलिकडेच केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीनची आयात केली, तसेच सोयाबीन तेलावरील आयात शुल्कही घटवले. त्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर होऊन त्यात घसरण झाली असा समज सध्या सगळीकडे होत आहे, त्...
धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचे निर्देश
बातम्या

धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्याचे निर्देश

मुंबई, दि. ३० : धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत  राज्यात खरेदी करावयाच्या धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक झाली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला दूदरदृश्यप्रणालीद्वारे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे,महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा...
‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात ओवा पिकाचा समावेश
बातम्या

‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात ओवा पिकाचा समावेश

शेती हा पारंपरिक तसेच आधुनिक असा व्यवसाय असून त्यामध्ये निरंतर बदल होत असतात. शेतीमध्ये सुध्दा इतर व्यवसायांप्रमाणे असणारी स्पर्धा तसेच बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थिती यास अनुसरून पिके, पीक व्यवस्था,, प्रक्रिया व पणन यांमध्ये शेतकरी व कृषी क्षेत्रातील व्यावसायिक सतत सुधारणा करत असतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्यावसायिक पिकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ विकेल ते पिकेल ‘ धोरण स्वीकारले आहे. ‘ विकेल ते पिकेल ‘ धोरणा अंतर्गत नाविन्यपूर्ण व स्पर्धात्मक पिकांना चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून ‘ ओवा ‘ पिकाचा समावेश करण्यात आला आहे. ओवा हे कोरड्या हवामानात येणारे पीक आहे. यासाठी चांगल्या निचऱ्याची जमीन फायदेशीर असते. कोरडे हवामान, हलकी-मध्यम जमीन व कमी पाण्याची गरज असल्यामुळे ओवा पीक राजस्थान व गुजरात राज्यात अधिक प्रमाणा...
खरीप पिकावरील रोग व नियंत्रणाचे उपाय
बातम्या

खरीप पिकावरील रोग व नियंत्रणाचे उपाय

हवामानातील सतत होत असलेले बदल, दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावत आणि अनियमित पाऊस यामुळे खरीपातील पिकांवर रोगाचे प्रादुर्भाव वाढलेले आहेत. भातावरील करपा – रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १२ दिवसाच्या अंतराने कॉपर ऑक्सिक्लोराईड १२५० ग्रॅम/ हेक्टरी किंवा कार्बेन्डाझिम ५०० ग्रॅम/ हेक्टरी फवारणी करावी. भातावरील कडा करपा – रोगाच्या तीव्रतेनुसार कॉपर ऑक्सिक्लोराईड १२५० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन ७५ ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी. मुग आणि उडीद वरील भूरी रोग – १० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ५ मिलि पेनकोनॅझोल किंवा ३० ग्रॅम विद्राव्य गंधक किंवा १० मिलि डिनोकॅप १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १० ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. कपाशीवरील जिवाणूजन्य करपा – १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा...
वैशिष्ट्यूपर्ण परदेशी ड्रॅगनफ्रूटची महाराष्ट्रातून दुबई इथं निर्यात
बातम्या

वैशिष्ट्यूपर्ण परदेशी ड्रॅगनफ्रूटची महाराष्ट्रातून दुबई इथं निर्यात

तंतूमय पदार्थ आणि खनिजांनी समृद्ध असे ड्रॅगनफ्रूट, ज्याला कमलमही म्हटले जाते त्या परदेशी वैशिष्ट्यपूर्ण फळाची महाराष्ट्रातून दुबईला निर्यात केली जात आहे. यामुळे अशा प्रकारच्या विदेशी फळांच्या निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधील तडसर इथल्या शेतकऱ्यांनी निर्यात होत असलेल्या ड्रॅगनफ्रूटचे उत्पादन घेतले आहे. तर, यावर आवरणाचे तसेच प्रक्रियेचे काम अपेडा मान्यताप्राप्त निर्यातदार एम/एस के बी यांनी केले आहे. ड्रॅगन फळाचे शास्त्रीय नाव हायलोसेरेयुसुंडेटस असून मलेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम या देशांमध्ये ही फळे पिकवली जातात. भारतात 1990 च्या सुरुवातीला ड्रॅगनफ्रूटचे उत्पादन घ्यायला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षात ड्रॅगनफ्रूटची लोकप्रियता वाढली असून देशातील विविध राज्यातले शेतकरी याची लागवड करु लागले आहेत. या फळाची लागवड सध्या प्रामुख्याने कर...