Monday, December 1

बातम्या

रब्बी हंगामातील सुधारित जिरायत व मर्यादित पाणी गहू व्यवस्थापन
बातम्या

रब्बी हंगामातील सुधारित जिरायत व मर्यादित पाणी गहू व्यवस्थापन

महाराष्ट्रातील ८७ टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवण आहे. या सर्व क्षेत्रात खरीप हंगामातील पिके ही पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. परंतु रब्बी हंगामातील पिके ही बहुतांश सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात घेतली जातात. त्यासाठी अवर्षणप्रवण क्षेत्रात रब्बी जिरायत गहू उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. जिरायती गहू उत्पादन वाढवण्यासाठी योग्य जमीन सुधारणा, सुधारित जाती, वेळेवर पेरणी, आवश्यक तेथे पाणी, पीक व किड संरक्षण इ. द्वारे जिरायत गव्हाचे उत्पादन वाढवू शकतो. जमीन गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करावी. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा. जमिनीची पूर्वमशागत योग्य पद्धतीने करून जमीन तयार ठेवावी. पूर्वमशागत गव्हाच्या पिकाकरिता जमीन चांगली भ...
महाराष्ट्रात 3886 शेतकऱ्यांकडून 16988 मेट्रिक टन खरेदी
बातम्या

महाराष्ट्रात 3886 शेतकऱ्यांकडून 16988 मेट्रिक टन खरेदी

33.30 कोटी रुपये मूल्याच्या हमीभावाचा लाभ; महाराष्ट्रासह 15 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये खरेदी प्रक्रिया प्रगतीपथावर खरीप विपणन हंगामात सुमारे 18.17 लाख शेतकऱ्यांना रु. 57,032.03 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ 2021-22 च्या खरीप विपणन हंगामात तांदळाच्या खरेदीची प्रक्रिया गेल्या वर्षाप्रमाणेच सुरळीतपणे सुरू आहे. या हंगामात 30.11.2021 पर्यंत महाराष्ट्र, चंदीगड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगण, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून/केंद्रशासित प्रदेशांमधून 290.98 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत 18.17 लाख शेतकऱ्यांना रु.57,032.03 कोटी मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात पंजाबमधून सर्वाधिक((18685532मेट्रिक टन) खरेदी करण्यात...
‘विकेल ते पिकेल’ अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळाला आत्मविश्वास
बातम्या

‘विकेल ते पिकेल’ अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळाला आत्मविश्वास

शेतमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘विकेल ते पिकेल’ अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात या अभियानाने 1 हजार 245 ठिकाणी शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीव्यवस्था उभी केली आहे. शेतकऱ्यांना या विक्री व्यवस्थेने चांगलाचा आत्मविश्वास दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या हस्ते 10 सप्टेंबर 2020 रोजी या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ झाला. शेतमाल विकण्यासाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या व ज्यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल अशी पीकपद्धती व शेतीपद्धतीची पूर्नमांडणी करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरु करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभी केली आहे. आज अखेर 1 हजार 352 ठिकाणे निश्चित करुन 1 हजार 2...
कापूस हमीभाव खरेदीबाबत केंद्राने उचलले असे पाऊल
बातम्या

कापूस हमीभाव खरेदीबाबत केंद्राने उचलले असे पाऊल

2014-15 ते 2020-21 या कापूस हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) कापसाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत कार्यान्वयनात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली खर्चाला मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2014-15 ते 2020-21 या कापूस हंगामासाठी भारतीय कापूस आयोगाला (CCI) 17,408.85 कोटी रुपयांच्या घोषित समर्थन मूल्यास मान्यता दिली आहे. (30.09.2021 पर्यंत) कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, 2014-15 ते 2020-21 या कापूस वर्षांमध्ये एमएसपी आधारभूत कार्ये करणे हितावह आहे कारण कापसाच्या किंमती एमएसपी इतक्या आहेत. त्याची अंमलबजावणी केल्याने देशाच्या आर्थिक उपक्रमांमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वसमावेशकता वाढते. किंमत समर्थन कार्यान्वयन कापसाच्या किमती स्थिर ठेवण्यास आणि शेतकर्‍यांचे संकट दूर करण्य...
देशभरात खाद्यतेलाच्या दरांचा उतरता कल
बातम्या

देशभरात खाद्यतेलाच्या दरांचा उतरता कल

केंद्र आणि राज्य सरकारांच्या सक्रिय सहभागामुळे खाद्यतेलाच्या दरांमध्ये घट गेल्या एक वर्षापासून खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सरकारने कच्चे पामतेल, कच्चे सोयाबीनतेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क २.५% वरून शून्य केले आहे. या तेलांवरील कृषी उपकर कच्च्या पाम तेलासाठी 20% वरून 7.5%, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलासाठी 5% वर आणले आहे. या कपातीमुळे, कच्च्या पाम तेलासाठी एकूण 7.5% आणि कच्च्या सोयाबीन तेल तसेच कच्च्या सूर्यफूल तेलासाठी 5% शुल्क झाले आहे. आरबीडी पामोलिन तेल, प्रक्रिया केलेले सोयाबीन आणि प्रक्रिया केलेल्या सूर्यफूल तेलावरील मुलभूत शुल्क सध्याच्या 32.5% वरून 17.5% पर्यंत कमी करण्यात आले आहे. कपात करण्यापूर्वी, सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्यतेलांवरील कृषी पायाभूत उपकर २०% होता. कपात केल्यानंतर, कच्च्या पाम तेलावर 8.25%, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच...
येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार
बातम्या

येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार

मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि. 12: येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी पाळावयाची सर्व मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृ...