रब्बी हंगामातील सुधारित जिरायत व मर्यादित पाणी गहू व्यवस्थापन
महाराष्ट्रातील ८७ टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवण आहे. या सर्व क्षेत्रात खरीप हंगामातील पिके ही पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. परंतु रब्बी हंगामातील पिके ही बहुतांश सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात घेतली जातात. त्यासाठी अवर्षणप्रवण क्षेत्रात रब्बी जिरायत गहू उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. जिरायती गहू उत्पादन वाढवण्यासाठी योग्य जमीन सुधारणा, सुधारित जाती, वेळेवर पेरणी, आवश्यक तेथे पाणी, पीक व किड संरक्षण इ. द्वारे जिरायत गव्हाचे उत्पादन वाढवू शकतो.
जमीन
गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करावी. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा. जमिनीची पूर्वमशागत योग्य पद्धतीने करून जमीन तयार ठेवावी.
पूर्वमशागत
गव्हाच्या पिकाकरिता जमीन चांगली भ...





